'पैलतोघे काऊ कोकताहे' या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचा अर्थ सांगू शकाल का? आपण विचारलेल्या अभंग संपूर्ण असा आहे. पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥१॥ उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ । पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥ दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी । जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥ दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी । सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥ आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं । आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥ ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें । भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥ रामकृष्णहरी वरील अभंग हा योगीराज माऊलींचा आहे . या अभंगात जगरीती प्रमाणे शकुन सांगतात ,ऐकतात किंवा शकुन मानतात असा एक अर्थ भरलेला आहे . तसाच दुसऱ्या अर्थाने विचार केला तर या अभंगात अध्यात्मिक साधनेत येणारे अनुभव सांगितले आहेत. थोडक्यात हा अभंग गूढार्थाने भरलेला आहे. आधी आपण शब्दार्था प्रमाणे विचार करू त्यानंतर गूढार्थाकडे जाऊ . लहानपणा पासून घराच्या अंगणातील झाडावर किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात कावळा ओरडत असला की आज पाहुणा येणार अशी आमची आजी सांगायची आणि खरोखरचं त्यादिवशी कुणीतरी...