Skip to main content

माझा मराठीची बोलू कौतुके

आज 27 फेब्रुवारी, मराठी भाषा दिवस. सकाळी माझ्या पत्नीने त्या निमित्त तिने शाळेत असताना अभ्यास केलेली ज्ञानेश्वरी मधील ही ओवी अणि त्याचा अर्थ सांगितला अणि तिचे कौतुक वाटले.

मराठी भाषे विषयी नुकताच एक सुंदर लेख वाचनात आला.

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। या संत ज्ञानेश्वरांनी लिहलेल्या चरणाचा अर्थ काय आहे?

संपूर्ण देशात जसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती प्रेरणादायी आहे तशी मराठी भाषा देखील. संत ज्ञानेश्‍वर म्हणतात,


माझा मराठीची बोलू कौतुके।


परि अमृतातेहि पैजासी जिंके।


ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।। ज्ञाने. ६/१४


असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे.अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे, अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्याच शब्दरूप झाली. ज्ञानेश्वरीत कर्म आहे; पण कर्माची कटकट नाही. ज्ञान आहे; पण ज्ञानाचा रुक्षपणा नाही. भक्ती आहे; पण ती भोळ्या अज्ञानाची नाही.

माझा मराठी चा बोल कौतुके।परि अमृताते हि पैजा जिंके।ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।।१४।।ज्ञानेश्वरी अध्याय सहावा.


योगमार्गाचे संस्कृत ग्रंथातील वर्णन पारिभाषिक(Jargon words) शब्दात आहे.ते पारिभाषिक शब्द जसेच्या तसे न वापरता, प्राकृतात (मराठीत)योगमार्गाचे वर्णन ऐकायला ,जाणते ,रसिक श्रोते तयार होतील का?ह्या शंकेचे समाधान प्रस्तुत ओवीत आहे.सध्याच्या काळात देखील हा प्रश्न अनेकांना पडतो.अधुनिक शास्त्रे इंग्लिश मधे आहेत, त्यातील विषय मराठीतून अचूक कसे व्यक्त होतील?


जेव्हा संत ज्ञानेश्वर गीतार्थ सांगण्यास सुरु करतात तेव्हा श्रोते म्हणतात"हा आठरा (काहींच्या मते सोळा),वर्षाचा मुलगा प्रयत्न करतो आहे ह्याचे कौतुक आहे.पण ते वर्णन जाणत्या रसिक श्रोत्यांना कितपत रुचेल?"ज्ञानोबा म्हणतात "श्रोतेहो,जरादेखिल शंका नको.मी अशी शब्दयोजना करेन की,मी केलेले वर्णन चांगले की अमृत? अशी स्पर्धा लावली तर मी केलेले वर्णन जिंकेल."


मराठीची भलावण ज्ञानेश्वरीत इतर आध्यायांतदेखिल आहे.उदाःआध्याय९ओवी२२.


बाकीचे सारे इतर सोपे करून सांगतीलच पण इथे नेहेमी एक गल्लत होते ती म्हणजे मेळवीन च्या ऐवजी मिळवीन असे लिहितात/ बोलतात. मेळवीन म्हणजे मेळ घालीन योजना करेन असे आहे.


मातृभाषेचा वाहता झरा ज्ञान देई सर्वा खरा


संत बहिणाबाई यांचा संत साहित्याशी काय संबंध आहे? या संबंधित काय पुरावे आहेत?

संत ज्ञानेश्वरांचे विचार मला कोठे वाचायला मिळतील?

ज्ञानेश्वरांनी एकविसाव्या वर्षी समाधी का घेतली?

संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल आपणास किती माहिती आहे?

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानाचा गाभा काय आहे?

संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये "मराठी" शब्दाचा उल्लेख कोठे आहे?

संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी (भावार्थ दिपीका) मध्ये सहाव्या अध्यायात "मराठी" या शब्दाचा उल्लेख आढळतो.


"तो अध्याय हा सहावा । वरि साहित्याचिया बरवा ।

सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देउनी ॥ १३ ॥


माझा मराठीचि बोलु कौतुकें । परि अमृतातेहीं पैजासीं जिंके ।

ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥ १४ ॥


जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे ।

वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥ १५ ॥


ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।

बोले इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥ १६ ॥


सहजें शब्दु तरि विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥ १७ ॥


नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी ।

ते म्हणती उघडली खाणी । रुपाची हे ॥ १८ ॥"


अशा प्रकारे संत ज्ञानश्वरांनी मराठी भाषेचे गोडवे गायिले आहे.

स्रोत :-

ज्ञानेश्वरी (भावार्थ दिपीका) 

quora 

Comments

Popular posts from this blog

112 Emergency number

Government of India has launched an emergency response number 112 . On calling this number, the cell records your location and can be used in any emergency situation be it fire, health, robbery, etc.  More information can be found on following link: 112 GOI See a short video about same. Thank you for visiting. Take care.

दक्षिणमुखी नंदी तीर्थ मंदिर

बेंगलोरमधील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी - मल्लेश्वरम - येथील हे प्राचीन मंदिर. या मंदिरात नंदीचे मुख हे दक्षिण दिशेला असल्याने दक्षिणमुखी नंदी तीर्थ असे नाव देण्यात आले.       या मंदिराचा इतिहास हा रोमांचकारी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर जीथे आहे तो प्लाॅट १९९७ पर्यंत खाली होता. जमीनीवर काही झुडपे वाढली होती. १९९७ साली काही बांधकाम करण्याच्या उद्देशाने साफसफाई करत असताना प्रथम नंदीची शिंगे दृष्टीस पडली. त्यानंतर हळूहळू बाजूने खोदले असता पूर्ण नंदीची मूर्ती मिळाली. या नंदीच्या मूर्तीची साफसफाई करताना एक अद्भुत गोष्ट घडली. नंदीच्या अंगावरील सर्व माती साफ केली आणि तोंडात जमलेली माती काढली असता नंदीच्या तोंडातून पाण्याची धार वाहू लागली. हा चमत्कार पाहून लोकांनी पुरातत्व खात्याला कळविले.       पुरातत्व विभागातील तज्ञांनी भेट देऊन हळूवारपणे उत्खननास सुरुवात केली. नंदीच्या मुखातून सतत पाणी येतच होते. ज्यावेळी पूर्ण उत्खनन झाले त्यावेळी हे मंदिर उजेडात आले. या मंदिराची रचना ही पूर्णपणे वेगळी आहे. नंदी वरती असून शंकराची पिंड खाली आहे. नंदीच्या मुखातून जे पाण...