Wednesday, December 20, 2023

जंगल साद

 नुकताच एक लेख वाचनात आला. जंगलातल्या खर्या राहणी बद्दल- 

✨ या दोघी  

        आणि जंगल...


    ❄️ या दोघी .एकीच वय ६० दुसरीचं ८०. दाजिपूरच्या जंगलाला लागून ठकूचा धनगरवाडा आहे. तेथे फक्त त्यांचे पिढ्यान पिढ्याचे एकच घर आहे. तिन्ही बाजुला दाट जंगल. यांच्या घरात आजही लाईट नाही. रस्ता नाही.

ठकूचा धनगरवाडा म्हणजे कै.ठकू धनगराचे घर. त्याची चौथी पाचवी पिढी आजही तेथे रहाते या पिढीतील ठकू धनगराची नातसुन लक्ष्मी वय ६०. व ठकुची मुलगी सोना वय ८0 व एक खापर पणतू याक्षणी येथे रहातो. आजुबाजुला वस्ती नाही. गवे बिबट्या अस्वलाचा यांच्या घराजवळ सतत वावर. त्यामुळे दिवस मावळला की घराचे दरवाजे बंद . सोबतीला फक्त दोन गावठी कुत्री. घरात रॉकेल किंवा डिझेलची चिमणी . ती विझवली की रात्रभर सभोवती फक्त काळोख आणि जंगलातून वाट काढत घुसणाऱ्या वाऱ्याचा घुमणारा आवाज. रात्री कुत्री भेदरून, आकसून कुई कुई करू लागली की या दोघींनी ओळखायच . बाहेर काय तरी आलय. आणि उठायच्या भानगडीत न पडता पुन्हा मुरगटुन झोपायच. पावसाळ्यात तर तीन महिने घराबाहेर पडायच नाही. लाकुड पेटवुन धुनी करायची आणि त्याच्या उबीला बसायच. लक्ष्मी व सोना साठ व ऐंशी वयाच्या. एक नातू कामानिमित बाहेर .दोन खापर पणतू मुंबईला. त्यामुळे तशी दोघींचीच एकमेकीला साथ. लाईट नाही रेडिओ नाही टीव्ही नाही .बोलुन बोलुन दोघीच एकमेकीशी काय बोलत बसणार? मग अंगणातल्या कोंबड्या, दोन कुत्री, तीन म्हशी , दोन मांजरं यांच्याशीच त्या काही ना काही बोलत असतात. आणि तीही समजत असल्या सारख या दोघीचं ऐकतात. 

यांना जगात नव्हे कोल्हापुरात काय चाललय माहित नाही. सोनाबाईला तर कोल्हापूर बघितलेल आठवत नाही. या दोघींना या जंगलातुन बाहेर पडणे शक्य नाही . पण आपल्याला दाजिपुरात या ठकूच्या धनगरवाड्यात जायला नककीच अडचण नाही. आणि एखादा महिला दिन या दोघीच्या सोबत त्यांच्या स्वच्छ सारवलेल्या अंगणात केवळ त्यांच्याशी बोलत बसुन साजरा करायलाही हरकत नाही..  

🔸 सुधाकर काशीद 

        तरुण भारत...

Friday, December 1, 2023

तावडे हॉटेल कोल्हापूर

इंटरनेट वरुन साभार..

तावडे हॉटेल

पुरात हॉटेल बुडाले हे हॉटेल शंकर कदम ऊर्फ तावडे यांच्यानंतर त्यांची मुले केरबा, पांडुरंग, बाबासाहेब, निवृत्ती आणि मुलगी हौसाबाई यांनी चालविले.


1989 मध्ये पंचगंगेला महापूर आला आणि त्यात निम्मे हॉटेल बुडाले. त्यानंतर शिरोली नाका ते गांधीनगर फाटा रस्ता चौपदरी झाला आणि त्या रस्त्याखालीच तावडे हॉटेलच्या खोपटाचा शेवट झाला. वीस वर्षे झाली, तावडे हॉटेलचे तेथे कसलेही अस्तित्व नाही, पण तावडे हॉटेलच्या आठवणी जाग्या आहेत. त्यामुळेच तावडे हॉटेल नसले तरी त्याची ओळख मात्र राहिली आहे. 


कोल्हापूर - कोल्हापुरात येण्यासाठी मुंबईपासून कन्याकुमारी पर्यंतच्या महामार्गावर कोणत्याही ट्रकमध्ये बसायचं, ट्रक ड्रायव्हर कन्नड, तमिळी, मल्याळी बोलणारा असू दे, त्याचा एक शब्दही तुम्हाला नाही कळू दे, कोल्हापुरात उतरायचं असेल तर कोल्हापूर नव्हे, फक्त #तावडे_हॉटेल असे म्हणायचे. तो ट्रक बरोबर कोल्हापूरच्या फाट्यावर येऊन थांबणार, म्हणजेच आपण "तावडे हॉटेल‘ केवळ हा एका शब्दाचा पत्ता सांगून कोल्हापुरात येऊन पोचणार. 


तावडे हॉटेल आणि कोल्हापूरचं नातं असं एक नव्हे, दोन नव्हे, 75 ते 77 वर्षे जपले गेले आहे. विशेष हे, की आज तावडे हॉटेलचं अस्तित्व संपून वीस वर्षे झाली आहेत. तावडे हॉटेलच्या खुणा नव्या चौपदरी रस्त्याखाली पूर्ण गाडल्या गेल्या आहेत. तरीही तावडे हॉटेल केवळ आपल्या नावावर ओळख टिकवून आहे. आज अतिक्रमण हटाओची कारवाई झाली पण चर्चा मात्र अतिक्रमणाशी कसलाही संबंध नसलेल्या तावडे हॉटेलच्याच नावाने झाली आणि तावडे हॉटेल या नावाची ओळख आणखीनच गडद झाली. कोल्हापूर आणि गांधीनगर, वळिवडे, चिंचवाडकडे जाणारा रस्ता ज्या ठिकाणी येऊन मिळतो, तो फाटा म्हणजे तावडे हॉटेल फाटा. आज या फाट्याला हॉटेलचे अस्तित्व सांगणारा एकही प्रत्यक्ष पुरावा नाही पण हॉटेल माहीत नाही असा एकही ट्रक, लक्‍झरी, एसटी ड्रायव्हर मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत मिळणार नाही. 


ज्यावेळी पुणे-बंगळूर हायवे शिरोली, शिरोली नाका, रुईकर कॉलनी, कावळा नाका, रेल्वे फाटक असा होता, त्यावेळी गांधीनगरकडे जाणाऱ्या फाट्याला 1940 मध्ये शंकर कदम ऊर्फ तावडे यांनी एका खोपटात हे हॉटेल सुरू केले. हॉटेल साधं छपराचं. पांढऱ्या भिंतींचं. दारात दोन लाकडाची बाकडी, रात्री एका बांबूला अडकवलेला मिणमिणता कंदील. त्या काळात ते हॉटेल म्हणजे जाणाऱ्या-येणाऱ्यांसाठीचा क्षणभराचा थांबा. या हॉटेलात चहा, भजी आणि बिस्किटाचा पुडा मिळायचा. शंकर कदम आणि त्यांची बायको गिरीजाबाई हॉटेल चालवायचे व सहकुटुंब हॉटेलच्या मागेच एका छपरात राहायचे. 


दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडचे निर्वासित वळिवड्याला निर्वासित छावणीत राहायचे. त्यांच्यासाठीच जे साहित्य येईल ते या हॉटेलच्या दारातच उतरवले जायचे व तेथून टांग्याने किंवा बैलगाडीने छावणीत पोचवले जायचे. हे हॉटेल म्हणजे रात्री-अपरात्री येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंचा आधार होते. हॉटेलच्या दारातील मिणमिणता कंदील हे एकट्या-दुकट्या वाटसरूला आधाराचे स्थान होते. 


या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक ट्रक ड्रायव्हरचे हक्काने थांबण्याचे ठिकाण म्हणजे तावडे हॉटेल. ऍल्युमिनिअमच्या पेल्यातील पाणी आणि कपभर चहा घेतला, की ड्रायव्हर तरतरीत व्हायचा आणि पुढे मार्गस्थ व्हायचा. त्यामुळे तावडे हॉटेलचे नाव दळणवळणाच्या क्षेत्रात एक संकेतस्थळ होऊन गेले.




Monday, November 27, 2023

Saltwater gargle for cough

How does the saltwater solution helps to cure cold and cough? 

Ever wondered when we gargle with salt water how it helps to reduce cough.

Salt water has osmotic properties, when the solution passes near mucus cells it draws water from the mucus cells effectively thinning the mucus layer. ( The salt concentration in the solution causes to create difference so water draws out of mucus) Salt water also soothes the throat.

When taken as nasal spray or drop it does the same action to reduce cold symptoms.



Saturday, November 4, 2023

मराठी संस्कृतीची आजची अवस्था

मराठी आणि एकंदरीतच खाद्य संस्कृती..

♦️तांदूळ भाकरी १५ रुपयांची महाग वाटते, आणि त्याच तांदळाचा डोसा ५० ते १५० रुपये असून सुध्दा महाग ही भाकरी वाटते.


♦️बटाटा वडा १७ रुपये झाला की महागाईत वाढ झाली असे वाटते पण त्याच बटाट्याचा मॅकडोनाल्ड चा बर्गर ९९ रुपये असला तरी महागाई वाढलेली वाटत नाही. 


♦️पारंपरिक व अत्यंत मेहेनातीची पुरणपोळी २५-३० रुपये झाली तर ग्राहकाची लूट चालू आहे असं वाटतं आणि त्याच चण्याच्या पिठाचा ५० रुपये १०० ग्रॅम ढोकळा हा योग्य दराचा वाटतो.


♦️भाजणी चकली, शंकरपाळे, विविध लाडू, थोडक्यात दिवाळीचे फराळे एक हजार रुपयात आखी दिवाळी आनंदात आणि नाती जोडण्यात घालवू शकतो पण दीड हजारात चौघांना पुरणार पिझ्झा, कॅडबरी, केक हा आज सणांची शान आहे असं लोकांना वाटतं. 


थालीपीठ, आंबोळी, सोलकडी, उकडीचे मोदक, अळूवडी असे अनेक पदार्थ आहेत जे आज बाजारात मराठी ग्राहकच पाठ फिरवत आहेत म्हणून दुर्मिळ होत चाललेत

Friday, September 29, 2023

Bengaluru regions and story

Bengaluru or Bangalore got its name from 'benda kaluru' or boiled beans. Similarly, the name of almost every locality in Bengaluru has a story behind it.


Marathahalli: The area received its name from a fighter aircraft named 'Marut', which was designed and assembled at the Hindustan Aeronautics Limited facility that's located close to this area. 'Halli' in Kannada means village.

Ulsoor: This area used to have a jackfruit orchard. Jackfruit is called 'halasu' in Kannada. 'Halasu-ooru' became Ulsoor.

Domlur: This area, which was dominated by people of Telugu origin, was notorious for its mosquito menace. Mosquitoes are called 'domalu' in Telugu. Hence, the place came to be known as Domlur.

Doddenekundi: Another Telugu-dominated area, it was originally called 'Dodda Nakka Vundi', which translates to 'there's a big jackal there'. Eventually, it became Doddanekundi.


Nagarabhavi: The name 'Nagarabhavi' literally translates to 'well of snakes'

Jayanagar: The name Jayanagar translates to 'victory city'. It is said to symbolise the first name of one of the rulers of the erstwhile Kingdom of Mysore, Maharaja Jayachamaraja. Yelahanka: The region was called 'Ilakipakka Naadu' during the rule of the Cholas. During the Hoysala reign, the city was known as 'Elavanka'. It eventually evolved to Yelahanka

Madiwala: 'Madiwala' in Kannada means washerman. The locality was home to a community of washermen and washerwomen and the place was named for them

Malleshwaram: The locality derives its name from the famous Kaadu Malleshwara Temple.

 

 

Wednesday, September 27, 2023

'घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ?

कोणत्याही देवाच्या आरती नंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.

आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ 

समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे.

वैशिष्ट्ये :

(१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत.

(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.

(३) पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.

(४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते.

(५) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.


आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया

१) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे | 

प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन | 

भावे ओवाळीन म्हणे नामा |

वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे

अर्थ...

विठ्ठलाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.


२) त्वमेव माता च पिता त्वमेव | 

त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव | 

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव | 

त्वमेव सर्व मम देव देव |

हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे इसवी सन पूर्व 2500 मध्ये लिहिले गेले आहे.

अर्थ.. 

तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.


(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा | 

बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात | करोमि यद्येत सकल परस्मै |

नारायणापि समर्पयामि ||

हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. (अंदाजे 7000 वर्षा पूर्वी) ते व्यासांनी लिहिलेले आहे.

अर्थ… 

श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.


(४) अच्युतम केशवम रामनारायणं | 

कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी | 

श्रीधर माधवं गोपिकावल्लभं | 

जानकी नायक रामचंद्र भजे ||


वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच इसवी सन पूर्व 2500 चे आहे.

अर्थ… 

मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.


हरे राम हरे राम | 

राम राम हरे हरे | 

हरे कृष्ण हरे कृष्ण | 

कृष्ण कृष्ण हरे हरे |

हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरणं' या उपनिषदातील आहे. 

कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे.


अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो.

Saturday, September 23, 2023

What is a dishwasher salt?

You have used dishwasher salt, ever wondered what is it ?

Dishwasher salt is a particular grade of granulated, crystalline sodium chloride intended for regenerating the water softener circuit of household or industrial dishwashers. Analogous to water softener salt, dishwasher salt regenerates ion exchange resins, expelling the therein trapped calcium and magnesium ions that characterize hard water. Dishwater salt granules are larger than those of table salt. The granule size ensures that the salt dissolves slowly, and that fine particles do not block the softener unit.

Dishwasher salt is unsuitable for cooking as it is not considered food grade and therefore may contain toxic elements.

If a dishwasher has a built-in water softener there will be a special compartment inside the dishwasher where the salt is to be added when needed. This salt compartment is separate from the detergent compartment, and generally located at the bottom of the wash cabinet (this is below the bottom basket). On most dishwashers, an automatic sensing system will notify the user when more dishwasher salt is required.

If the dishwasher has run out of the salt that regenerates the ion exchange resin that softens the water, and the water supply is "hard", limescale deposits can appear on all items, but are especially visible on glassware.

In areas with soft water there is no need to use dishwasher salt for the machine to work. There is an option to adjust the water hardness making the machine to use no amount of salt brine for every dish cycle.


Ghats in Maharashtra - Mountain Passes

  A   ghat  is nothing but a mountain pass. The term “Ghat” describes the mountain pass in Maharashtra. They pave the way for passage from o...